World Through The Eyes of an MBA

Diary of an MBA….

चातकीय मतदान.

 

मेघ दाटूनी आले हिमवर्षावासाठी जणू,

धरित्री पुलकित झाली रोमांचला अणु रेणू.

 

पावसाची लागता चाहूल चातक झाले बेभान,

उडू लागले सैरभैर विसरून आपले देहभान.

 

पाण्याची होती त्यास प्रतिक्षा गत श्रावणापासून,

पाण्याचा थेंब पडेल म्हणून बसले ते आ-वासून.

 

पण यंदाही त्याची परत झाली फसगत,

विना पावसाने त्याची वेडया सारखी झाली गत.

 

पण तो क्षुद्र पामर काय करणार?

पुसू लागला सगळ्यान्ना, परत कधी पाउस पडणार?

 

आपल्या देशात लोकांचेही असेच आहेत हाल,

विकास कधी होणार हे विचारून ते झाले आहेत बेहाल

 

दर पाच वर्षान्नी मतदानरूपी मेघ दाटूनी येतो

लोकांच्या पैशाला आणी आशेला वाटा पाडून जातो

 

मतदानमेघाची चाहूल लागताच मतदार होतात वेडे

दिसेल त्याला वाटत सुटतात कपडे, पैसे आणी पेढे

 

लोकांना वाटते अता तरी विकास काम मार्गस्थ होतील

रस्ते, पाणी आणी वीजेचे प्रश्न ज़रा सुटतील

 

पण तीथे चातकाची जी अवस्था तीच लोकांची येथे होते

इच्छा अपेक्षा जागीच मरतात, आणी परिस्थिती परत जैसे थे

 

परत पुढील मतदाराकडूनच्या अपेक्षा बांधणीस सुरुवात होते

हे जाणून सुद्धा की पुढील पीक ही तसेच आहे जसे पूर्वीचे होते.

 

 

प्रसाद भगवंतराव कुलकर्णी

औरंगाबाद.

April 7, 2009 Posted by Prasad Kulkarni | Politics, माझ्या कविता... | , , , | No Comments Yet